जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान
संविधान लागू झाले असले तरी लोक माणसात काही फरक पडला नाही; मनुसृतीचे दहन केले तरी तिचा जण माणसांवरचा प्रभाव कमी झाला नाही. आई धरती दुभंगली तरी लेकराची हेडसह होऊ देत नाही वडील आभाळ फाटले तरी लेकराला पोरके होऊ देत नाहीत हे जर दिप्तीला सांगितले तर तिचा विश्वास बसणार नाही. कारण तिच्या आई-बाबानी तिचा संसार उद्वस्त केला. “ तिला जन्म देऊन सगळ्यात मोठी चूक केली म्हणून अशा मुलींना शिकवायला नको कारण तिने कुटुंबाचे नाव खराब केले “ हे उद्गार आहेत दीप्ती मेश्राच्या आईचे. दीप्ती आणि अनिश दोघे हि मध्यम वर्गीय कुटुंबाचे घटक आहेत फक्त दीप्ती ब्राम्हण आणि अनिश दलित जातीत जन्माला आले. दोघांनी चांगले शिक्षण घेतले M A करताना त्यांची ओळख झाली त्याचे मैत्रीत आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले. दोघे हि ग्राम सेवक म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले आणि नंतर त्यांनी लग्न केले. यात वरवर सर्व सामान्य दिसत असले तरी खरी प्रेम कथा लग्नानंतर सुरु होते. लग्न झाल्यावर तिला बरेच दिवस सासरी नांदायला जाऊ दिले नाही तिच्या वडिलांनी अनिशवर बलात्कारा