खरच अंतर जातीय विवाहामुळे आई-वडिलांच्या भावनांना ठेच पोहचते का?
महाविद्यालयात गेल्यापासून अभय आणि अविनाश एकमेकांशिवाय राहत नसत त्यांची मैत्री एवढी घट्ट होती कि, दोघे एकमेकांपासून जरा लांब असले तर त्यांच्यात काही भिन्स्ले असावे अशी शंका घेण्यास जागा होती; कारण त्यांनी मैत्री जीवापाड जपली. पदवीचे पहिले २ वर्षे त्यांनी आपल्या मैत्रीने महाविद्यालयात वेगळी ओळख निर्माण केली पण फक्त त्यांची घट्ट मैत्री एवढीच मर्यादित ओळख नव्हती तर अभय सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर होता त्याने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. त्याला नाटकात अधिक रस असल्यामुळे तो रंग मंचावर जास्त वेळ रमत असायचा त्याच रंग मंचावर त्याच ताकदीची नटी होती तिचे नाव राणी. अभय आणि राणी दोघे आपल्या भूमिकेत शिरले कि त्या भूमिकेशी एकरूप होऊन काम करायचे आणि त्यांची हि पात्राच्या भूमिकेशी तादात्म्य पावण्याची वृत्ती सर्व सहयोगी कलाकारांना प्रेरणा देत असे. रंग मंचावर नाटकातून ३ तास प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या या युगुलाने कधीच एकमेकांची मने जिंकली होती; त्यांच्या वागण्यातील बदल अविनाशने अचूक हेरला आणि औपचारिकता त्याने पूर्ण केली. ते जेवढे जीव ओतून कामात मग्न व्हायचे त्यापेक्षा जास्त