आत्महत्या ग्रस्त पत्नी ते 29 एकर शेतीची मालकीण
पुरुष प्रधान समाजाने तिला देबी म्हणून पुजले; तर चप्पल म्हणून वागवले. त्याच पुरुषावर जेव्हा संकट कोसळते त्यावेळी तो खचून जातो; संकटासमोर शस्त्र टाकतो. पण ती खचत नाही, मागे पाऊल टाकत नाही अशीच एक जोति देशमुख नावाची माझ्या अकोला जिल्ह्यातील कट्यार गावातील 29 एक्कर शेताची मालकीण सर्व महिलांसाठी आदर्श आहे. तर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या तोंडावर चपराक मारते; कर्जाच्या खाईत बुडून नाही तर निसर्गाच्या उलट चक्रात अडकून नैराशाच्या गर्तेत सापडून अनेकांनी जीवन संपवले; आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून निघून गेले. अशा एका कुटुंबातील जोति ताई 2001 ते 2007 या काळात घरातील सर्व कर्त्या पुरुषांनी गळ्यात फास अडकवून घेतला. कुटुंब रस्त्यावर आले. आणि सुरू झाली ताईंची परीक्षा जेमतेम 10-वी पर्यन्त शिक्षण झालेल्या ताईंना शेतीचे कण भर देखील ज्ञान नसताना त्यांनी मन भर पीक काढले. त्यांचे गाव अकोला जिल्ह्यातील खारपण न पट्ट्यात येते; म्हणजे जमिनीतील पानी खारट असते पण समु द्राच्या पाण्यासारखे अत्यंत खारट नसते म्हणजे आपण ते सहज पिऊ शकतो. फक्त त्याची चव थोडी वेगळी लागते अशा परिस्थितीत त्या