पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

[ तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केले; पण माझ्यापेक्षा देशावर जास्त प्रेम केले ]

इमेज
"तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केले; पण माझ्यापेक्षा देशावर जास्त प्रेम केले", हे उद्गार आहेत शहीद जवानांच्या पत्नीचे निकिता कौल यांचे सैन्यात लेप्टनंट पदावर रुजू झाल्यावरचे. 😊 ज्या नात्यात प्रेम असते, ते नाते सर्वाधिक सुंदर असते. प्रेम आपल्याला अशक्य ते शक्य करण्याची शक्ती देते, विस्कटलेली आयुष्याची घडी बसवण्याचा विश्वास देते, म्हणून प्रेम सर्व शक्तिमान असते. 💕 मेजर विभूती शंकर डोंडियाल हे सैन्यात भरती झाल्यावर सर्वांना आनंद झाला होता. तसे ते आई-बाबांचे लाडके; पण राष्ट्रभक्तीने भारावलेल्या या गुणवान लेकराने भारत मातेचे रक्षण करण्याचा संकल्प सिद्धीस नेला. सर्व काही सुरळीत सुरु असताना त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्लीत बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करणाऱ्या निकिता कौल यांच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली. दोघांचा सुखी संसार सुरू झाला. आपल्या आयुष्याची अनेक स्वप्ने त्यांच्या डोळ्यात तरंगत होती. तोच अनपेक्षित दिवस उगवला; दहशदवाद्यांचा पाठलाग करत असताना, १७-०२-२०१९ रोजी मेजर साहेब शहीद झाले😢😢.   या दुखत त्यांच्या स्वभाग्याचे लेन असणार कुंकू पुसल्या गे

18 वर्षाच्या मुलीने आईसाठी खोदली कबर

इमेज
[ सुख के सब साथी ; दुःख मे न कोई]  महामारीच्या काळात मानवाला मानवाचा स्पर्श नको आहे; त्याची सावली देखील आपल्यावर पडू नये अशी त्याची इच्छा आहे. अनेक घरांना कायमचे कुलूप लागले, अनेकांचे माता-पिता  कायमचे सोडून गेले, अनेकांना आपल्या मुलांच्या चिता जळताना उघड्या डोळ्यांनी पाहाव्या लागल्या, तर काही मुलांवर बालपणातच जन्मदात्यांच्या चितेला अग्नी देण्याची वेळ आली आहे.  राज्य गणित परिस्थिती भिन्न आहे. आज एखाद्या घरात कोरोना बाधित रुग्ण दगावला; तर अंत्य विधीसाठी देखील कोणी  येत  नाही. महाराष्ट्रात अनेक सोयंसेवक अशा व्यक्तींवर अंत्यसंस्कार करतात; पण बिहार सारख्या राज्यात मात्र सहसा कोणी धजावत नाही.  बिहार राज्यातील एका गावात १८ वर्षाच्या मुलीला आपल्या आई साठी कबर खोदावी लागली आणि अशा परिस्थितीत  लहान भाऊ-बहिणीसह तीच्यावर आपल्या कुटुंबाची धुरा सांभाळायची वेळ आली. हि बातमी bbc   मराठी       या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे.   वडील कोरोना बाधित झाले. त्यांना तिने रुग्णालयात दाखल केले; त्यांचा दुर्दैवाने प्राण गेला. ती तब्ब्ल ३ तासांचा प्रवास करून घरी आली; आणि आईला तातडीने रुग्णालयात नेण

शेवटी ती आलीच

इमेज
आता घरातील वातावरण बिघडणार, भांड्याला भांडी लागणार, दोघांमध्ये खटके उडणार, शिव्यांच्या वाकुल्या वाहिल्या जाणार, आई-बाबा असणारे चिमुरडी अनाथ मुलांसारखी भासणार, पुन्हा उपासमार , मा-झोड हे सर्व सुरु होणार; कारण ती आली आहे.  मागच्या सरकारने स्थानिक महिलांच्या आग्रहामुळे आणि परिसरातील समाज सुधारकांच्या शिफारशींमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व गाव-शहरात दारू बंदी केली होती; आज विद्यमान सरकारने निर्णय बदलून दारू विक्रीला मान्यता दिली.  या निर्णयावर सर्व स्तरातून टीका होत आहे. याचा अनेक सामाजिक कार्र्यकर्त्यानी तसेच स्थानिक महिलांनी निषेद केला  आहे.  या निर्णयाची पाठ राखण करताना चंद्रपूरचे पालक मंत्री  म्हणाले , [ दारू बंदी उठवण्याच्या बाजूने २५०००० निवेदने प्राप्त झाली; तर दारू बंदीच्या समर्थनार्थ ३३००० निवेदने प्राप्त झाली. ] मंत्री माहुद्यांचा हा दावा लोकशाही पद्धती पेक्षा बहुमताचा वाटतो कारण लोकशाही शासन व्यवस्थेने राजकीय स्थिरते सोबत सामाजिक स्वास्थ्य चांगले कसे राहणार? या बाजूने विचार करणे अपेक्षित असते.  आजच्या लेखात आपण पुढील काही महत्वाच्या मुद्द्यांवर विचार करू.   १ दारू बं

मी तिचा मालक नसून जोडीदार आहे

इमेज
बदलत्या जगात सर्वत्र वेगाने बदल घडून येत आहेत. पण आज देखील खुरचटलेले विचार, पुराणमतवादी मानसिकता, धार्मिक पगडा इत्यादी गोष्टींचे प्राबल्य कायम आहे. याचे बळी सामान्य माणसांपासून अगदी उच्च्भ्रू व्यक्तींपर्यंत आहेत. आणि यावर टीका होत असली तरी स्वतंत्र निर्णयाचा आधार घेऊन विषय संपवला जातो.  आज माझी क्रिकेटपटू इरफान पठाण यांच्या मुलाच्या नावाने समाज माध्यमावर असणाऱ्या अकाउंटवर पूर्ण कुटुंबाचा फोटो टाकला होता. त्यात ते त्यांचा चिमुकला आणि त्यांची राणी तिघे हि आहेत पण त्यांच्या पत्नीचा चेहरा मात्र झाकलेला आहे. यावर प्रचंड टीका झाली. नेटकऱ्यानी तुम्ही त्यांचे मालक आहात का?  विचारल्यावर इरफान पठाण यांनी उत्तर देताना मी तिचा मालक नसून जोडीदार आहे. असे ठणकावून सांगितले आणि या उत्तरानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले.  या प्रशांवर चर्चा करण्यापूर्वी इरफान पठाण यांच्या वैवाहिक जीवनावर एक दृष्टिक्षेप त्यांच्या पत्नीचा जन्म १९९४ साली सवडी अरब अमिरात देशात झाला. त्यांचे वडील त्या देशातील प्रसिद्ध व्यापारी त्यांचा विवाह २०१६ साली मक्का येथे पारपडला. त्यांना एक मुलगा आहे. त्या दोघांचे अनेक छायाचि

या मुलीने परभणीत पिकवली नादरलँडची मिरची

इमेज
दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि मागासलेला विभाग हे चित्र आहे महाराष्ट्रातील मराठवाडा विभागाचे.  हे वास्तव पुसून काढण्यासाठी इथल्याच एका लेकीने/  चिऊताईने प्रयत्न केला;  आणि आपल्या चोचीतून भाग्य बदलण्याचे  उदात्त ध्येय बाळगून ते कृतीत उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. [  युरोपात जर्मनी आणि मराठवाड्यात परभणी ] ही म्हण सार्थक ठरवण्याचा प्रयत्न परभणीतील [वैष्णवी देशपांडे]  या युवतीने केला आहे.  त्यांनी  टाळेबंदी असताना  नादरलँड देशातून मिरचीचे बीज  आयात केले; आणि परभणी जिल्ह्यातील आपल्या शेतातील दहा गुंठे क्षेत्रफळावर कृत्रिम तापमानाची व्यवस्था करून मिरचीची लागवड केली.  आणि आज त्या मिरचीची विक्री करत आहेत.  हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतानाच,  त्यांनी गावातील अनेक महिलांना रोजगार देऊन महामारीच्या काळात अनेक चुली पेटवण्याचे काम  त्या करीत आहेत.   वैष्णवी यांचे शिक्षण एम ए इतिहास महामारीच्या आधी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून आपण विद्यार्थ्यांसमोर ऐतिहासिक काळ उभा करावा;  आणि इतिहासातून वर्तमान जगण्याचा दृष्टीकोन विद्यार्थ्यांना द्यावा;  आणि भविष्यात निवडायची पाऊलवाट त्यांना दाखवून

लिव इन रिलेशनशिपची नेमकी चौकट कोणती?

इमेज
श्लिल अश्लील नैतिक अनैतिक मानवी स्वभावाच्या अनेक पैलू मधील एक पैलू  आहेत. पण याही पलीकडे जगाच्या कानाकोपऱ्यात सृष्टीच्या सर्व घटकात जपणारा;  आणि चिरकाल अमरत्व असलेला भाव म्हणजे प्रेमभाव.   प्रेम नात्यांच्या बंधन घट्ट करणारा  घटक आहे; कुटुंबाला एकसंध ठेवणारा दुवा  आहे; भेदाभेद तफावत उच्चनीचता या सर्वांना खड्यासारखे दूर  करणारा धागा आहे;  २ मनाला जोडणारा दुवा  आहे. याच प्रेमाने नाती जोपासले जातात,  संसार थाटले जातात,  आणि कुटुंब प्रस्थापित केले जातात.  सामाजिककीड असणारी जाती व्यवस्था प्रेमातूनच मातीमोल झाली;  या व्यवस्थेला मोडण्यासाठी प्रेम विवाह घडून येणे आवश्यक आहे.  असे प्रतिपादन अनेक महापुरुषांनी केले असताना;  या दिशेने पाऊल टाकणाऱ्या युवक-युवतींच्या समोर समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे.  तो केवळ बुरसटलेल्या समाजानेच नव्हे,  तर विवेकी विचारांवर श्रद्धा असावी अशी अपेक्षा असणाऱ्या न्यायालयाने सुद्धा यांना आरोपाच्या कचाट्यात उभे केले;  आणि प्रश्न निर्माण झाला.  १  श्लील अश्लील नैतिक-अनैतिक त्याचे निकष तरी कोणते?  २  खरंच प्रेम करणे नैतिक दृष्ट्या ठीक आहे का?  ३  विवाह शिवाय दो

पाक लष्करातील भारतीय अधिकारी

इमेज
          रंगमंचावर सैनिकाच्या वेषात नाटक करणारा हा कलाकार आयुष्याच्या नाट्यमय वळणांवर यशस्वीरीत्या भूमिका पार पाडणारा ठरला.  भारतातल्या या देशभक्ताने पाकिस्तानातील लष्करातील मेजर पदापर्यंत चा प्रवास सहजरित्या देशभक्ती च्या जोरावर आणि राष्ट्र प्रेमाच्या साक्षीने  पूर्ण केला;  शेवटी कठीण समय भारत सरकारने हात काढून घेतले एकट्याला सोडून दिले.  पण देशभक्त पाकिस्तानी अधिकारी मात्र डगमगला नाही; आणि त्याचे राष्ट्रप्रेम तीळभरही कमी झाले नाही.  राष्ट्र संरक्षणासाठी अनेक हेर जिवाच्या आहुती देतात काही यशस्वीरीत्या आपली कारकीर्द पूर्ण करतात तर काही अर्ध्यावर्तीत एखाद्या चुकीमुळे आयुष्य संपवतात.  अजित डोवाल यांचेही आयुष्य असंच विलक्षण आहे ते वाचण्यासाठी इथे नक्की भेट द्या  https://www.premsparsh.com/2021/04/blog-post_23.html   11 एप्रिल 1952 रोजी राजस्थान राज्यात रवींद्र कौस्तुकीं यांचा जन्म झाला.  वडील हवाई दलात असल्यामुळे देशभक्तीचे संस्कार त्यांच्यावर  बालपणापासून झाले. रवींद्र सुरुवातीपासूनच नाट्यकलेत पारंगत  होते. एका राष्ट्रीय नाट्य स्पर्धेत लखनवला ते रंगमंचावर नाट्य सादर करत अस

अजिंक्य राजा छत्रपती संभाजी राजे भोसले

इमेज
             नियतीच्या भरोशावर अवघा आयुष्य सोडून लाचार निराधार आणि निरागस तिचं जिन इथल्या रयतेच्या नशिबी आलं होतं अंधश्रद्धा आणि अज्ञान या दोन्ही गोष्टी एकत्र असल्या की मग दारिद्र्य हे त्यासोबत येतच अशा भयभीत करणाऱ्या जगण्यातून बाहेर पडण्यासाठी प्रतिकूल असणाऱ्या परिस्थितीत एक प्रकाशाची ठिणगी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडली;  आणि त्याचा वणवा इथल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये पेटला स्वाभिमान जागा झाला.  आपल्या अस्तित्वासाठी लढलं पाहिजे आणि रयतेने स्वाभिमानाने जगले पाहिजे.  स्त्री, मुले,  वृद्ध या सगळ्यांचा सन्मान झाला पाहिजे.  त्यासाठी स्वराज्य अस्तित्वात येणे आणि त्यासाठी आपण लढणे हे आपल्या जगण्याचं अंतिम ध्येय ठरवलेली शेकडो-हजारो लोक महाराजांसोबत आले.  आणि अहोरात्र परिश्रम करून संकटांना संधीत परावर्तित करून निर्भिड छातीने मावळे लढायला लागली त्यातूनच स्वराज्य निर्माण झाले. https://www.premsparsh.com/2021/06/blog-post_6.html   स्वराज्य अनेकांनी उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.  पण सगळे कुटिल डाव मावळ्यांनी उधळून लावले. स्वराज्य निर्मितीच्या काळात  बऱ्याच वेळा महाराजांना माघार