शेवटि तिचे ही लग्न झालेच
हे जीवन सुंदर आहे असे आपण कायम म्हणत असतो पण सौंदर्याचा शोध कोठे घ्यायचा हे मात्र ज्याने-त्याने ठरवायचं असते. कुणाला ते गोऱ्यागोमट्या चेहऱ्यात सापडते तर कुणाला संघर्षाच्या वाटेवरून प्रवास करणाऱ्या वाटसरूच्या कर्तृत्वात घावते काही मात्र व्यक्तीचा गुण स्वभावात / वर्तवणुकीत सौंदर्य शोधतात त्यामुळेच कदाचित असे प्रेमी जगावेगळे ठरतात. स्त्री-पुरुषांमध्ये विवाह होणे सामान्य बाब आहे. एखाद्या सर्वसामान्य मुलाने / मुलीने दिव्यांग व्यक्तीबरोबर रेशीमगाठ बांधली तर समाजाचे तिकडे लक्ष वेधले जाते. पण धडधाकट असणाऱ्या व्यक्तीने तृतीयपंथी जोडीदार निवडला तर मात्र समाज परिवर्तनाची मशाल पेटवली जाते. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड शहरात किन्नर सपना आणि बाळू या प्रेमी जोडप्याने अनेक प्रतिष्ठित व्यक्तीच्या साक्षीने पुढील कित्त्येक पिढयांना प्रकाश देणारी मशाल पेटवली. या विवाहाची तेव्हापासून राज्यभर जोरदार चर्चा सुरु आहे या आधी गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात असाच एक ऐतिहासिक विवाह संपन्न झाला होता त्याबद्दल वाचण्यासाठी– ऐतिहासिक विवाह सपना आणि ब