अजित डोवाल व्यक्ती की, वृत्ती
राष्ट्र भक्ती माणसाच्या धमन्यांमधून वाहत असेल तर देशासाठी ती व्यक्ती बलिदान देण्यास सदैव तत्पर असते. अशा व्यक्तीसाठी देश हेच आपले कुटुंब असते. आणि आपल्या कुटुंबाची प्रगती हि जेवढी महत्वाची आहे. तेवढीच सुरक्षा आवश्यक आहे. देशाच्या सीमांवर रक्षण करण्यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देणारे सैनिक भारत मातेच्या सर्व लेकरांची संरक्षक असतात. पण देशांतर्गत हिंसक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, प्रत्येक नागरिकाला सुरक्षिततेची हमी देण्यासाठी पोलीस नावाची यंत्रणा तैनात असते. अशाच एका पोलीस अधिकाऱ्याने या देशाच्या इतिहासात आपल्या कर्तव्य निष्ठेची मुहूर्तमेढ रोवून सैनिकांना मिळणारे कीर्ती चक्र हे पदक पटकावले. या शस्त्र हातात न घेता लढणाऱ्या योध्याने सिक्कीमला भारतात सामील करण्यासाठी सिंहाचा वाट उचलला. मिझोरम राज्यात एक प्रकारची हुकूमशाही उधळून लोकशाही राज्यात रूपांतरित केले. काश्मीर काश्मीर मध्ये निवडणुका घेण्यासाठी वातावरण तयार