खुदाने त्याचे हात घेतले; ती त्याचे हात झाली.
विवाह आयुष्याचा जोडीदार निश्चित केल्याचा सोहळा याद्वारे आयुष्याचे सुंदर स्वप्ने रंगवण्याची सर्वांची इच्छा असते आई वडिलांना वाटते आपल्या लेकीचे सासर आनंदी असावे श्रीमंत असावे तर मुलाच्या आई वडिलांची इच्छा असते आपली सून एक आदर्श पत्नी असावी तिने या घराला घरपण द्यावे अशा अनेकांच्या अनेक इच्छानी हा विवाह सोहळा घडून येत असतो सर्व साधारण सर्वत्र जोडून केलेले विवाह घडत असतात म्हणजे सर्वसंमतीने जोडले जातात त्याचबरोबर स्वतःचा जोडीदार स्वतःच्या मर्जीने निवडण्याची स्वातंत्र्य वृत्ती दिवसागणिक वाढत आहे अर्थात या पैकी बहुतांश प्रेम विवाह असतात पण आता प्रेम हे व्यक्तीवर केले जात नसून त्याच्या पद प्रतिष्ठा पैसा या त्रिकोणावर केले जाते मग गरीब श्रीमंत हि दुरी प्रकर्षाने जाणवते आणि जर कोणी प्रेम जिवंत ठेवण्यासाठी हे आधुनिक निकष पाळले नाहीत तर अशा विवाहांना विरोध होणारच हे जणू आपले सामाजिक कर्तव्य आहे या अविर्भावात सर्वजन वावरत असतात खरे प्रेम त्यावेळी जिवंत असते जिथे सर्वांच्या विरोधाला झुगारून प्रेम विजयी होते. पाकिस्थानातील लाहोर शहरातील अशीच एक प्रेम कहाणी किंबहुना या प्रेमी युगुलांची आ