राष्ट्र पित्याची संसार गाथा
काही कुटुंबे असे असतात ज्यांची कर्म भूमी अमर्याद असते; काही जोडपी अशी असतात ज्यांचे केवळ जन्माला घातलेले मुले स्वतःची असत नाहीत तर संपूर्ण समाज त्यांच्यासाठी लेकरा समान असतो. त्या मुलांना मोठ्या मनाने माप करण्याचे हृदय त्यांच्याकडे असते; मुलांनी काही चूक केली तर त्यांचा कां धरून त्यांना योग्य दिशा दाखवण्याचे अधिकार त्यांना असतात; असे आदरयुक्त सामाजिक स्थान असणारी व्यक्ती म्हंजी कस्तूरबा मोहनदास हे गांधी दाम्पत्य आहे. 2 मित्रांनी आपल्या मित्रत्वाचे नात्यात रूपांतर करायचे ठरवले; आणि केवळ 6 वर्षांच्या वयात कस्तुरबा आणि मोहनदास यांचा विवाह ठरला. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. कस्तुरबा यांचा जन्म ११-४-१८६९ रोजी झाला तर गांधीजींचा ०२-१०-१८६९ रोजी झाला अर्थात ते सहा महिन्यांनी लहान होते. सुरुवातीला योग योगाने वडिलांनी एका रूढ प्रतेला फाटा देऊन नवा प्रवाह सुरु केला. अजून देखील पती पेक्षा पत्नी लहान असावी हीच प्रथा आहे. बापू विलायतेला शिक्षण घेण्यास गेले असताना, त्या एकट्या राहिल्या; एक मेकावरील दृढ निष्ठा हे त्यांच्या नात्याला घट्ट बांधून ठेवणारे होते.