पोस्ट्स

प्रेम विवाह वास्तव की आभास

इमेज
अडीच अक्षरांची दुनिया भलतीच न्यारी, एकमेकांचा जीव घेण्यासाठी आणि एकमेकांना जीव देण्यासाठी सदैव तत्पर असतात नर नारी  ज्याला ते प्रेम म्हणतात,  आयुष्यभर सोबत जगण्यासाठी यालाच ते प्रेम म्हणतात एकमेकांचे तोंड न पाहण्यासाठी.   महामारी  सुरु झाल्या नंतर अनेक वेळा आमचे बोलणे झाले. पण नेहमी इकडच्या-तिकडच्या  गप्पा मारून फोन ठेवला जात  असे;  असा त्याने काळ फोन केला आणि बोलता बोलता त्याच्या मनातील गुप्त दडून राहिलेल्या भावनांना व्यक्त करावं असं त्याला वाटले.  आणि हा माझा मित्र त्याने अनुभवलेले दुःख,  त्याने केलेला संघर्ष सर्व काही मोकड्या मनाने सांगू लागला. महामारी सुरु होण्याच्या आधी त्याचे महाविद्यालयीन जीवन आनंदी होते. त्याच्या स्वप्नातील परी त्याच्या सोबत होती. त्यांनी देखील अनेकांसारखे कधी हि पूर्ण न होणारे अनेक स्वप्ने रंगवली होती. आणि महामारी सुरु झाली महाविद्यालय बंद झाले त्यांच्यातील संवाद दिवस गणिक कमी कमी होऊ लागला;  त्याची परिमिती म्हणजे त्यांच्यातले सर्व प्रकारचे सम्बन्ध संपले.  पण असे का घडले?  याचे उत्तर त...

खुदाने त्याचे हात घेतले; ती त्याचे हात झाली.

इमेज
विवाह आयुष्याचा जोडीदार निश्चित केल्याचा सोहळा याद्वारे आयुष्याचे सुंदर स्वप्ने रंगवण्याची सर्वांची इच्छा असते आई वडिलांना वाटते आपल्या लेकीचे सासर आनंदी असावे श्रीमंत असावे तर मुलाच्या आई वडिलांची इच्छा असते आपली सून एक आदर्श पत्नी असावी तिने या घराला घरपण द्यावे अशा अनेकांच्या अनेक इच्छानी हा विवाह सोहळा घडून येत असतो सर्व साधारण सर्वत्र जोडून केलेले विवाह घडत असतात म्हणजे सर्वसंमतीने जोडले जातात त्याचबरोबर स्वतःचा जोडीदार स्वतःच्या मर्जीने निवडण्याची स्वातंत्र्य वृत्ती दिवसागणिक वाढत आहे अर्थात या पैकी बहुतांश प्रेम विवाह असतात पण आता प्रेम हे व्यक्तीवर केले जात नसून त्याच्या पद प्रतिष्ठा पैसा या त्रिकोणावर केले जाते मग गरीब श्रीमंत हि दुरी प्रकर्षाने जाणवते आणि जर कोणी प्रेम जिवंत ठेवण्यासाठी हे आधुनिक निकष पाळले नाहीत तर अशा विवाहांना विरोध होणारच हे जणू आपले सामाजिक कर्तव्य आहे या अविर्भावात सर्वजन वावरत असतात  खरे प्रेम त्यावेळी जिवंत असते जिथे सर्वांच्या विरोधाला झुगारून प्रेम विजयी होते. पाकिस्थानातील लाहोर शहरातील अशीच एक प्रेम कहाणी किंबहुना या प्रेमी युगुलां...

प्रेम विवाहणे पेटवली दंगल

इमेज
आता जगायचे कि मरायचे हे जाचे त्याने ठरवायचे? कारण राजधानी असणारे दिल्ली शहर कट्टरपंथीयांनी रक्ताची होळी खेळण्यासाठी निवडले आहे. आज त्यांनी रंगीत तालीम करून दाखवली; आणि त्या गल्लीला निम लष्कराने स्वरक्षण दिले आहे. एकाच गल्लीत राहणारे ख़ुशी आणि सुमित हे दोन भिन्न धर्मीय प्रेमी सुमित हिंदू तर ख़ुशी मुस्लिम त्यांच्या प्रेमाचे रूपांतरण लग्नात झाले; आणि २०/०३/२०२१ रोजी त्यांनी लग्नाचा बार उडवला. त्यानंतर सर्वत्र चर्चाना उदान आले; आणि  मुलीच्या धर्माचे लोक सोघशीत धर्म रक्षक रस्त्यावर उतरले. आणि त्यांनी दिसेलतेतोडायला फोडायला सुरुवात केली. आणि यांच्या लग्नाचा विरोध केला. आता" खून से होळी खेळेनगे" म्हणून निघून गेले त्यामुळे सर्वत्र दहशद पसरली असून आता दिल्ली पोलीस आणि निम लष्करी दलाने स्वरक्षणाची धुरा सांबाळली आहे. पण काही महत्वाचे प्रश्न इथल्या व्यवस्थेला आणि समाजाला विचारावे लागणार आणि त्याचबरोबर चिरफाड करावी लागेल आपण स्वीकारलेल्या तथाकथित मूल्यांची जे आम्हाला पुरोगामी विचारांपासून कोसो दूर ढकलतात" आणि चुराडा करतात आमच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा; शोधावा ला...

संकटात बुडलेली संस्कृति

इमेज
गेल्या काही दिवसांपासून संस्कृतीच्या सोघोषीत दलालांनी बाजार मांडलाय; ते वाटेल त्या दराने आपली मूल्ये विकतात, जर कोणी खरेदीला नकार दिला तर त्यांच्यावर लादतात, विरोध केला तर दुसऱ्याला निरोपयोगी ठरवतात, म्हणजे एका उत्पादकाने दुसऱ्याच्या उत्पादनाची बदनामी करावी त्याप्रमाणे शेवटी देशी उद्योगाचे भावनिक शस्त्र वापरून विदेशी विचारणा आचरण दुय्य्म दर्जाचे ठरवतात; हे सर्व फक्त महिला खरेदीदारांची आहे पुरुषांची मात्र येथे नोंदणी केली जात नाही. उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री एका सरकारी कार्यक्रमात सहभागी झाले असताना त्यांनी महिलांबद्दल विधान केले. त्यांच्या या विधानात त्यांनी स्वतःचा एक अनुभव सांगितला ते एका विमानाने प्रवास करत असताना, त्यांच्या बाजूला एक महिला आपल्या मुलांना घेऊन बसली असताना तिने मुख्यमंत्र्यांच्या शब्दात फाटलेला जीन्स घातला होता. तो जीन्स फाटलेला नसून त्यांनी स्त्रियांनी घालावयाच्या पारंपरिक पोषक न घालता वेगळा पोषक परिधान केला होता. माननीय विद्यमान मुख्यमंत्र्यांना हे भारतीय संस्कृतीवरचे संकट वाटले त्यांच्या मते अशा प्रकारचे कपडे घालणाऱ्या माता आपल्या मुलावर...

धर्म की अधर्म

इमेज
भारतीय संस्कृतीने जगाला सहिष्णुतेचा संदेश दिला; प्राचीन काळापासून धर्म निरपेक्षतेची वागणूक दिली; आज देखील इथे हिंदूंच्या सणात मुस्लिम सहभागी होतात तर मुस्लिमाच्या सणांमध्ये हिंदू सहभागी होतात. आपापल्या धर्माचे पालन करत असताना दुसऱ्या धर्माचा सन्मान करणे हे आपल्यातल्या विविधतेत एकटा आणणारे आहे. पण आज या सर्व गोष्टींचा विसर इथल्या दोन्ही धर्मातील कट्टरपंथियांना झाला आहे कारण इथे दररोज धार्मिक भेदावर हिंसा होते आहे. याचा  कळस  गाठला गाजियाबाद शहरातील एका मंदिरात घडलेल्या घटनेने; १२ ०३ २०२१ रोजी १४ वर्षाचा मुसलमान धर्माचा मुलगा एका हिंदू मंदिरात पाणी प्यायला गेला असताना त्याला मारहाण झाली. त्याची चित्रफीत तयार करून समाजमाध्यमवर पसरवली गेली नंतर जागतिक प्रसारमाध्यमाने हि बातमी उचलून धरली आणि सर्वत्र या विषयावर चर्चा सुरु झाली. एका खाजगी वाहिनीच्या पत्रकारांनी त्या मंदिराची पहाणी केली तर तिथे एक मुख्यद्वारावर फलक होता त्यावर लिहिले होते हे" मंदिर हिंदूंचे पवित्र मंदिर आहे त्यामुळे मुसलमानांना इथे प्रवेश बंदी आहे" मुळात एखाद्या धार्मिक स्थळावर दुसऱ्या धर्माच्य...

हत्यारी लेक

इमेज
स्वामीतीनी जगाचा आई विना भिकारी असे सत्य पचवायला फार जड जाते. कारण या सत्याला अपवादात्मक अनेक घटना आपल्या अवती भवती घडतात; अशीच एक काळजाला चटका लावणारी घटना अकोला शहरात घडली. आणि त्याचे सत्य २ दिवसांपूर्वी बाहेर पदले एका तरुणीने संपत्तीच्या वादातून आपल्या आईचा खून केला; सुरुवातीला याच मुलीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि मग पोलिसांचे चक्र फिरल्यावर तिने सत्य कथन केले. तिने सांगितले, " आमच्यात संपत्ती वाटपावरून अनेक दिवसांपासून वाद आहेत घटना घडली त्याच दिवशी आमच्यात जोराचे भांडण झाले त्यात मी माझ्या आईचे डोके दगडावर आपटले आणि हि घटना घडली" हि बातमी जुनी झाली असल्यामुळे कदाचित तुम्ही वाचली असेल; हि पण महत्वाचे आहे ज्यांनी जन्म दिला, लाडात वाढवले, तळहाताच्या फोलासारखे जपले, शिकवून शाहने केले. त्याच जन्मदात्यांच्या हत्या करताना यांचे काळीज तर्कापत नसेल का? मग आज आम्ही कोणत्या जगात जगत आहोत जिथे संपत्तीच्यावादातून अशे पाऊल उचलतो यासाठी बदलती जीवन शैली जवाबदार आहे कि, वाढलेली स्पर्धा, आणि त्यातून आलेले नैराश्य, भावंडात वाढलेला परस्परांबद्दलचा द्वेष, ...

प्रेमाची किंमत

इमेज