पैगंबरची प्रेम कहाणी
प्रेम विवाह ही गोष्ट समाजात रुधली असली तरी ती समाजाने स्वीकारली नाही. प्रेम विवाह करण्यासाठी आज देखील अनेकांना खूप मोठा सांघर्ष करावा लागतो; पण हे धाडस केवळ आजचे तरुण करतात असे नाही. इतिहासात असे प्रेम विवाह झाल्याचे शेकडो उदाहरणे आढळतात पण त्यात नेहमी पुरुषांचा पुढाकार असल्याचे जाणवते. पण या मानशिकतेला अपवाद ठरली एक उद्योजक महिला. ६-व्य शतकातील या नररागिणीने कुटुंबातील पुरुषांना थणकाऊं सांगितले, [ मी स्वतः माझ्या जोडीदाराची निवड करणार ] तिचे नाव होते खडीजया वडिलांचा मोठा व्यवसाय होता. त्यांच्या नंतर मुलीने आपल्या बळवर वाढवला त्याकाली उंटावर समान लाडून वाहतूक केली जात असे. त्यामुळे त्यांचा भरपूर प्रवास होत असे म्हणून तत्कालिन रितीनुसार आपल्या चुलत भावसही लग्न करायचा सल्ला तिला देखील दिला पण तिने तो साफ धुडकाऊं लावला. खडीजयाने एका मुलाची निवड केली; आणि विवाहबद्ध झाली. सामान्यतः हे रुदहींना छेद देणारे असले तरी ही तर तिची सुरुवात होती. दुर्दैवाने तिचा पती काही दीवसातच निधन पावला. तिने मग दूसरा विवाह केला आणि संसार थाटला; पण नियतीला ते मान्य नव्हते तिने खडीजयच्या नशिबात चिरकल अमर राहील असे अद्भुत काही तरी लिहून ठेवले होते. त्यासाठीची सतत परीक्षा नियती घेत होती आणि खडीजया पूर्ण गुणांनी उत्तीर्ण होत असे. दोघांमध्ये असणारे परस्परांविषयीचा आदर कमी होत गेला त्यांच्यातील मतभेद वादळे आणि आजच्या भाषेत खडीजयाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आणि आता या विवाहाचा फासातून कायमचे मुक्त होण्याचा निर्णय घेतला आणि आपले संपूर्ण लक्ष्य व्यवसायावर केन्द्रित केले. त्यांच्याकडे एक तरुण तेजस्वी तरुण कामगार होता. त्याचे नाव मोहमद् त्याच्या दृढ निश्चय कामातील एकाग्रता यांसारख्या गुणांवर खडीजया भावल्या. एका गरीब मुलाने श्रीमंत महिलेचे हृदय जिंकले, गृहस्त आश्रमातून निघून गेलेल्या व्यक्तीला परत आणले, थोडक्यात 40 वर्षाच्या श्रीमंत मालकिनीला 25 वर्षाच्या तरुण कामगाराने आपल्या कर्तृत्वाने प्रेमात पाडले. आणि आजच्या काळात देखील अशक्यप्राय वाटणारी ही गोष्ट आजपासून 14 शे वर्षांपूर्वी घडली. यातून केवळ एक प्रेम विवाह घडून आला नाही; तर पुरुष प्रधान संस्कृतीला फाटा दिला. आज देखील कोणत्या मुलीचे आधी लग्न झाले असेल तर तिच्याशी पहिल्यांदा लग्न करणारा मुलगा लग्न करत नाही. एवधच काय 25 वर्षाचा तरुण 40 वर्ष्याच्या महिलेशी गाठ बांधत नाही. सर्वार्थानं हा विवाह एक अनोखा होता त्यांना 4 मुले झाली त्यातील केवळ मुली वाचल्या. आज इस्लाम मध्ये बहू पत्नित्व आढळते त्याकाळात अनेक पत्नी असणे सर्वमान्य होते पण यांनी त्या गोष्टीला देखील फाटा दिला. आणि एक पत्नीत्वाचा आदर्श घालून दिला. यामुळे प्रेम माणसांतील सर्व अभवांना स्थान देत नाही तर दोन हृदय एकमेकांकडे आकर्षित झाले तर त्यांना कोणी रोखू शकत नाही. यावर शिक्का मूर्तब करते या विवाहमुळे मोमहदानचे जीवन स्थिर झाले. त्यांच्या समोरील आर्थिक समस्या सुटल्या, संघर्षमय जीवनाला एक नवीन दिशा मिळाली; आणि त्यातून जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणारा इस्लाम धर्म उदयास आला. ते नंतर अध्यापनाकडे वळले त्यातून त्यांना साक्षात्कार झाला; ते पहिले अनेक ईश्वरवर श्रद्धा ठेवत असत हा त्यांच्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. त्यावेळी खडीजयाने त्यांना आधार दिला; या साक्षात्कारबद्दल ऐकणारी खडीजया पहिली महिला ठरली. त्यांनी इसाई धर्माचा अबयास करणाऱ्यांशी चर्चा केली आणि एक ईश्वर वादावर जोर दिला. आणि अल्ला हाच सर्वांचा पालक आहे; तारणहार आहे असा प्रचार करता करता इस्लाम पसरवण्यासाठी खडीजया सुद्धा आघाडीवर होत्या. त्यांच्या मृत्तिव नंतर पैगंबरांनी अनेक विवाह केले; पण त्यांच्या मनातील खडिजयचे स्थान कोणी भरू शकले नाही. जगाच्या पाठीवर अनेक प्रेम विवाह झाले पण असा केवळ एकमेव विवाह झाला; पुनः होणे नाही. जिथे आज देखील स्त्री डांबून ठेवली जाते तिथे त्याकाळात असा धाडसी निर्णय घेणे वाटते तितके सोपे नव्हते. त्यांनी समाजाला शिंगावर घेतले, रुदहींना पायाखाली तुडवले, पुरुष प्रधान संस्कृतीला टाकून दिले, त्यांच्या या प्रेमाचा ताज अध्याप देखील साक्षी आहे. आजच्या पिढीने यातून आपल्या प्रेमाच्या कक्षा वाढवण्याची गरज आहे. व्यक्तीकएनदरी असणारे आमचे जीवन व्यापक होण्याची अवशक्त आहे. आज पद, पैसा, प्रतिष्ठा यावर तुमचे प्रेम ठरते; पण खरे प्रेम त्यापलीकडे असते. ते त्या व्यक्तीवर केलेले निस्वार्थी मग प्रत्येकाची कहाणी वेगवेगळी असते त्यातील संघर्ष त्याग सर्व काही विलक्षण असतो. रूसवे फुगवे नकार होकार असे प्रेम अधिक घट्ट करते. जगाला दिशा दाखवणारे अनेक प्रेमी युगूळ आहेत प्रेमासाठी लोक सर्व प्रकारची किंमत मोजण्यास तयार असतात. इंदिरा आणि फिरोज यांची कहाणी असईच एक अद्भुत आहे. https://www.premsparsh.com/2021/01/blog-post_5.html प्रेमात वयाचे बंधन नसते, तुम्ही कुठून आलात कशे दिसता तुमच्याकडे किती संपत्ति आहे हे सर्व गळून ठरते. म्हणून आयुष्य सुंदर करण्यासाठी प्रेम करायला शिकल पाहिजे त्यासोबत प्रेम द्यायला शिकण्याची गरज आहे. नाते तोंडण्या पेक्षा ते जोडून आयुष्याची चादर विणण्यात अधिक साहस असते. प्रेमातूनच नवीन आविष्कार घडतात ज्याने जग बदलून जाते.
फोटो - साभार गूगल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा