पोस्ट्स

ज्योतिबाची नस

इमेज
महात्मा जोतीराव गोविंदराव फुले या कर्म योगी,  विचारवंत,  समाजाची नस ओळखणाऱ्या वैद्याने आजच्या  दिवशी सण १८९० साली निर्मिकाच्या दिशेने   प्रस्थान  केले .   त्यांच्या   स्मृतीस  विनम्र अभिवादन  कर्तृत्वाचा वटवृक्ष महात्मा फुले    हजारो वर्षांपासून   आपल्या या अवस्थेला    जवाबदार कोण?  या प्रश्नाचे उत्तर इथल्या बहुजनास ठाऊक नव्हते. त्याचा ठाव घेण्या इतपत त्यांचा बहुधिक विकास देखील होण्याचे कारण नाही;  शिक्षण फक्त अभिजन  पुरुषांची मक्तेदारी होते.  या शिक्षणात कार्यकारणभावाचा अभाव असल्यामुळे आपल्या माता भगिनी शिक्षणापासून वंचित आहेत याची खंत अभिजन पुरुषाला वाटणारच कशी.  उभ्या आयुष्यात जनतेच्या सेवेस अर्पण केलेल्या सेवकाची कर्म गाथा    आपल्या मेंदूत सेवाभाव  ऊतराव म्हणून     आजचा प्रपंच.  एकदा हिटलरने एका कोंबडीचे पंख छाटले त्यापासून  ती कोंबडी त्याचा माघे-माघे फिरत असे तो तिला दाना टाकायचा त्यावरच ती आपले पोट भरायची.  कितीतरी शतकांपूर्वी काही...

संविधानाचे भक्षक

इमेज
  आम्ही भारताचे लोक आज सुरक्षित, अनुकूल, पोषक वातावरणात जगत आहोत कारण आमच्या घटनेने कायद्याचे राज्य निर्माण केले  आहे.  कमालीची विविधता असणाऱ्या देशाला एकसंध ठेवणाऱ्या संविधानाला शतशः नमन देशाचा राज्यकारभार चालवण्याची तत्वे ज्या पुस्तिकेत नमूद केलेली असतात त्यालाच आपण संविधान म्हणतो स्वातंत्र्य भारत देशाचे संविधान २६-०१-१९५० पासून अमलात आले असले तरी २६-११-१९४९ रोजी संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घटना समितीने स्वीकारले.  त्यापासून या मातृभूचा सर्वांगीण विकास झपाट्याने होत आहे.  पहिले राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा आता मताच्या पेटीतून येतो.  म्हणूनच अगदी सामान्य कुटुंबात जन्माला आलेले राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, आमदार, खासदार इत्यादी लोकप्रतिनिधी राज्यकारभार हाकताना दिसतात. हि आजची लोक शाही व्यवस्था आपली वाढ करण्यासाठी पोषक जमीन तयार करत असली तरी तिला अद्याप यश आले नाही; कारण हजारो वर्षांच्या बहुधिक दिवाळखोरीचे अंश अजून जिवन्त आहेत.  काही हजार वर्षांपूर्वी या देशात एक पुरुष जन्माला आला होता कदाचित त्याच्याकडे गर्भाशय असावे असा म...

शेतकऱ्याची खुर्ची

इमेज
  राजा तुझी दशा आहे केविलवाणी,  ह्ळ ह्ळ तेरे मन मन डोळ्यामध्ये येते पाणी..  विकासाच्या नावाने निसर्गाचा विनाश केला आणि या प्रगतीच्या चक्रात माझा शेतकरी बाप होरपडून मेला.   “जय जवान जय किसान” अशा घोषणा दिल्या जातात येथे;  पण या घोषणांच्या आक्रोशात बळी राजा उधवस्त झाला. कधी  अस्मानी तर कधी सुलतानी संकटे माझ्या पूर्वजांची परीक्षा घ्यायचे आता देखील तोच पेपर आम्ही सोडवतो; फक्त सुलतानशाही गेली असली तरी लोकशाहीतील सत्ताधीश परीक्षकाच्या खुर्चीत बसले.  पक्ष-प्रतिपक्ष राजकारणाचे डाव आमच्या बांदावर मांडतात पण त्यांच्या लढाईत किसान धारातीर्थ पडला.  स्वातंत्र्यापासून आजमितीस शेतकऱ्याने जे-जे म्हणून शासनाच्या जबल्यातून खेचले असेल त्यासाठी त्याला रक्त सांडावे लागले अनेकांना प्राण द्यावे लागले हा इतिहास दिवसागणिक त्यात भर घालतो आहे.  काल दीडवर्षापासून राजधानीच्या वेशीवर सुरु असणाऱ्या आंदोलकांना पंतप्रधानांनी सुखद धक्का दिला  त्यांची कडी हि भेट न घेता ३ कृषी कायदे माघे घेण्याचे आश्वासन दिले.  या कायद्यांविषयी आपणास माहिती असेलच म्हण...

बाल मित्रांसाठी खुले पत्र

इमेज
  कर्तृत्वाने अवकाश कवेत घेतले असताना त्याच स्फूर्तीने यशाचे शिखर सर करायचे असेल तर तुमच्यातील बालक जिवन्त असावाच लागतो.  देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू कदाचित लहानग्यांच्या प्रेमामुळेच सर्व शक्ती एकवटली असताना जमिनीवर होते त्यांच्यातील स्वार्थी माणूस डोके वर काढू शकला नाही.  आयुष्याच्या एका टप्प्यावर सर्व सुख पायाशी लोळण घेत असले तरी बाल मनाची जिज्ञासा त्यांच्यातील यत्किंचित हि कमी झाली नाही हा स्वानुभव समोर ठेवून सर्वांच्या चाचानी त्यांचा जन्म दिवस बालदिन म्हणून साजरा करावा अशी इच्छा व्यक्त केली असावी.    सर्व प्रथम सर्व बाळ मित्रांना हक्काच्या बालदिनाच्या अंतःकरणापासून शुभेच्छा  तुमचे आयुष्य निरामय आणि मंगलमय असावे हि ईशवर चरणी प्रार्थना.  आज काही मी उपदेश वैगेरे करणार नाही फक्त पोकडं स्वप्ने देखील दाखवणार नाही माझ्या मनातील सर्व काही या छोट्याशा पत्रातून सांगणार आहे.    प्रिय मित्रानो,  पत्र लिहिण्याचे प्रयोजन तुम्हास ठाऊकच आहे.  आज मी शरीराने तरुण झालो,  समाजाच्या दृष्टिकोनातून जवाबदार नागरिक झालो,...

चला प्रकाश येऊ द्या

इमेज
सर्व वाचकांना प्रकाशमय दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा,  तुमच्या आयुष्यात चैतन्य येऊन  ते अधिक देखणे आणि मन्गलमय व्हावे हि ईशवर चरणी प्रार्थना,   हा दीप उत्सव नवीन वाट दाखवून त्यावाटेने  प्रवास करण्यासाठी नक्कीच आपणास मदत करणार असा विश्वास वाटतो.  दिवाळीच्या दिवसात सर्वत्र कडाक्याची थंडी आणि शाळेला दांडी,  त्यात आनंदात भर घालण्यासाठी,  वातावरणात चैतन्य भरण्यासाठी घरोघरी प्रकाशमान झालेल्या पणत्या मन मोहून टाकतात.  एकमेकांच्या घरी जाऊन एकत्र फराळाची चव चाखण्याची मजाच काही और असते.  तो आठवडा फक्त अनुभवता येतो शब्दात वर्णन करणे माझ्यासाठी अशक्य आहे.  या सर्व आठवणी जिवन्त करणारा म्हणूया नाही तर त्यात भर घालणारा आजचा दिवस आहे.  हि दिवाळी सर्वांसाठी एकाच दिवशी येत असली तरी एक सारखी नसते; कोट्यवधी लोकांच्या डोळ्यात आनंदाचे तर लक्षावधी लोकांच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू तरळत असतात.  काही घरातील करते स्त्री-पुरुष देशाच्या सेवेत व्यग्र असतात त्यांच्या आई-वडिलांच्या  तोंडात पुरणपोळीची चव गोड राहत असणार का?  ज्यांचे जन्म...

सापाने केली पत्नीची हत्या

इमेज
सर्व वैवाहिक माणसे एवढी धडपड कशासाठी करतात?  २  वेळचे जेवण करण्याची सोय असताना, डोक्यावर सुरक्षित छप्पर असताना, आरोग्यासाठी तरतूद केली असताना, समाजात प्रतिष्ठा असताना संपत्तीचे संग्रहण का करतात?  थोडक्यात  आई-वडील आपल्या लेकरासाठी कष्ट का उपसतात?  याचे सर्व मान्य उत्तर मुलांच्या आनंदी आयुष्यासाठी.  याचं फलित काय होईल?  अशी चिंता न करता ते अहोरात्र झटत असतात.  पण हेच जन्मदाते आपल्या मुलीची लग्न गाठ एका हत्यारांबरोबर बांधून देतील यावर तुम्ही विश्वास तरी कसे ठेवणार !  म्हणून तुमच्या समोर सविस्तर घटना ठेवणे उचित ठरेल.    दक्षिणेतील छोटेसे पण सर्वार्थाने संपन्न राज्य अशी केरळ राज्याची ओळख आहे.  या राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी एका हत्यारा असणाऱ्या पतीला दुहेरी जन्म ठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली कारण त्याने सापाच्या मदतीने पत्नीची हत्या केली.  पण हे प्रकरण एवढे सरळ असते तर दुर्मिळ अशी दुहेरी जन्म ठेपेची शिक्षा थोटवण्याचे कारणच काय?  म्हणून प्रकरणाच्या मुळाशी जाऊन समजून घेऊ-  ३ वर्षांपूर्वी सूरज आणि उ...