पोस्ट्स

प्रेमाचे दान

इमेज
अलीकडच्या काळात शिक्षण घेणाऱ्या मुलींची केवळ संख्याच वाढत नाही तर अशा सुशिक्षित मुलींमध्ये निर्णय घेण्याचे धाडस देखील कमालीचे निर्माण झाले आहे; त्यामुळे खऱ्या अर्थानें महिला सक्षमीकरण होत असल्याचे दिसते.  मुलींची देशातील पहिली  शाळा १८४८ साली फुले दाम्पत्याने सुरु केल्याची सर्वाना माहिती आहे त्याचबरोबर गेल्या कित्त्येक वर्षांपासून महिला सर्व क्षेत्रात आपली कर्तबगारी पारपडत असताना शेकडो वर्षांचा अज्ञानाचा धब्बा पुसण्यासाठी त्या झटत आहेत.    याचे प्रमाण कमी असले तरी दिवसागणिक वाढत आहे त्यामुळे वर्तमानातील हि चळवळ उद्याच्या मुलींसाठी लैंगिक समानतेवर आधारलेला भारत देश घडवणार यात यत्किंचित हि शंका नाही.  हे सर्व आशादायक चित्र असले तरी आज अनेक सुशिक्षित मुलींना आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य नाकारले जाते त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा व्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे.  आपल्या देशात लग्न ठरवताना कायम व्यक्तीपेक्षा त्याच्या हुद्द्याला प्राधान्य अधिक असते कारण आपल्यातील बाजारी मानसिकता दोघांची मिळकत लक्षात घेऊन विवाहासाठी मुलाची / मुलीची निवड करते....

धोक्याची घंटा

इमेज
सुरुवातीला मानव हा इतर प्राण्यांसारखे लैंगिक सम्बन्ध ठेवत असे त्याच्यावर कुणाचे नियंत्रण नव्हते.  या अनियंत्रित मानवी समाजात सर्व काही अनिश्चित होते जसे आजच्या प्राणी  मात्रांमध्ये आहे.  त्यानंतर मानवी जीवन बदलत गेले त्यात आमूलाग्र बदल आज झालेले दिसत असले तरी ते सर्व एकाचवेळी झाले नसून टप्प्या-टप्प्याने झाले आहेत ते थेट आजच्या स्थितीपर्यंत येऊन पोहचले असून त्यात प्रत्येक दिवशी सूक्ष्म बदल घडून येत आहेत.    भटका माणूस टोळी करून राहायला सुरुवात झाल्यावर त्याच्यातील जवाबदार्यांची वाटणी झाली त्यापैकी काही पुरुषांकडे तर बहुतांशी स्त्रियांच्या खांद्यावर आल्या.  परिणामस्वरूपी एवढे जवाबदार्यांचे ओझे पेलत असताना तिच्या स्वातंत्र्याचा श्वास गुदमरला आणि तिने स्वतःला ४ भिंतींच्या आत बंदिस्त करून घेतले; या अवस्थेपर्यंत तिला नेऊन ठेवण्याचा कट पुरुषांनी रचला हे उघड सत्य आहे.  आज कुटुंब नियोजनाचे साधने विकसित झाली असली तरी त्याबाबतीत लोकांमध्ये जागरूकता नाही.  जसे ५० वर्षांपूर्वी सर्व धर्मीय अनेक मुलांना जन्माला घालायचे ती वेळ आज पुन्हा येऊ शकते....

ज्याच्यावर प्रेम नाही त्याच्यासोबत लग्न कसे करायचे?

इमेज
सृष्टीच्या उगमापासऊन नर आणि मादी यांच्या मिलनातून आपल्यासारखा दुसरा जीव तयार होतो त्यालाच आपण प्रजनन म्हणतो. सुरुवातीला मानवी जीवन भटक्या स्वरूपाचे असले तरी त्याच्यातील काम भाव जागृत होते त्याच्या आधारावरच हे मानवी चक्र सतत फिरत राहिले कदाचित तत्कालीन पुरुषांना स्त्री एका बाळाला जन्म कसा देऊ शकते याचे ज्ञान नसल्यामुळे त्याला हे सर्व अदभूत वाटत असावे त्यातूनच मग स्त्रियांना देवतेचे स्वरूप प्राप्त झाले असावे.  त्यानंतर त्याच्या विचारात परिवर्तन झाले आणि कोणती हि स्त्री पुरुषाच्या सहभागाशिवाय मुलं जन्माला घालू शकत नाही याची जाणीव झाली असावी. त्याकाळात या भटक्या माणसाचे जीवनमान थोडेसे बदलले तो स्थिर झाला एका जागी राहून जमीन कसायला त्याने सुरुवात केली त्यातूनच स्त्री-पुरुषांमध्ये एक वेगळे नाते निर्माण झाले ते एकमेकांच्या लैंगिक गरजा भागवणारे २ भिन्न लिंगी व्यक्ती राहिले नाहीत तर त्यापलीकडे एकमेकांना भावनिक आधार देणारे,  मानसिक समाधान देणारे,  आनंदात हसणारे,  दुःखात रडणारे,  एकमेकांसाठी झटणारे सहचारी बनले.    त्यामुळेच त्यांच्यातील लैंगिक सम्बन्ध...

महिलांवर ठरवून अत्याचार केले जातात

इमेज
एका ठिकाणी ठीगड लावलं तर दुसऱ्या ठिकाणी फाटतच हि अवस्था आजच्या महाराष्ट्राची झाली आहे.  महिला अत्याचाराची साखळी अद्याप तोडण्यात आपल्याला यश आलेलं दिसत नाही पुण्यातील सामोहिक अत्याचार त्या नंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईतील साकी नाका प्रकरण घडले ते शांत होत नाही तोच उल्लास नगर मध्ये घडलेली घटना या सर्व घटनांकडे पाहताना मनात एक शंका येते;  महिला अत्याचार ठरवून केले जातात का?  हि शंका वाटणे स्वाभाविक आहे कारण गेल्या काही दिवसांपासून अगदी नियोजित पद्धतीने महिलांवर / मुलींवर अत्याचार केले जातात.  त्यात देखील महाराष्ट्रातील २ मोठ्या शहराचा यात समावेश आहे म्हणजे या नराधमांनी आपल्या सुरक्षा व्यवस्थेला वेठीस धरण्यासाठी निष्पाप मुलींचा / महिलांचा घास घेण्याचा घृणास्पद मार्ग निवडला आहे.  त्यामुळे सर्व प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करत असताना या सर्व घटनांमध्ये काही एकमेकांना जोडणारे धागे-दोरे आहेत का?  याचा देखील पोलिसांनी विचार करावा त्याचबरोबर करविता धनी दुसरा कोणी आहेका?  याचा देखील तपास घेणे गरजेचं आहे.  उल्लास नगर मध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका पडक्या घ...

महिला अत्याचाराचे राजकारण

इमेज
भारत मातेच्या  छाटाड्यावर पाय देऊन इथे कायम महिला अत्याचाराचे राजकारण करण्याची घृणास्पद परम्परा सुरु आहे. सर्वच राज्यकर्ते आपली राजकीय गोळा बेरीज  करून सोईचे राजकारण करण्यात धन्यता मानतात त्यांच्यासाठी अशा घटना आपली खालावलेली प्रतिमा सुधारण्यासाठी आयतं कोलीत देतात.  आपल्या देशाचा इतिहास लक्षात घेतल्यास सर्व काळात स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवल्याचे निदर्शनात येते त्याचबरोबर पुरुषी वर्चस्वाने याना दाबून ठेवण्याचे कटकार्यस्थान रचल्याचे आपणास माहिती आहे. याचा पुरावा देणारे  इतिहासात अगदी वैदिक संस्कृतीपासून ते आजपर्यंत सर्व कालीन उदाहरणे आपल्याला मिळतील.  महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बलात्काराची साखळी सुरु आहे त्यातील मुंबईतील एका पिढीतेचा जीव गेला आणि उसना भाव आणून राजकीय लोकांनी आपली परम्परा तशीच कायम ठेवली हे केवळ या घटने पुरते मर्यादित नाही;  सर्वत्र सारखेच दिसते फक्त सत्ताधारी आणि विरोधकांच्या भूमिकेतील चेहरे बदलतात.  त्या सोबत शक्य असेल तिथे तिखट मीठ लावून जात / धर्म आणून अधिक वातावरण तापवितात.  पण महिला अत्याचार थ...